आज एकता महिला सामाजिक प्रतिष्ठान- मुंबई तर्फे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देणे हा माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ध्यास आहे. अशा उपक्रमांमधून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरापासून समाजापर्यंत सकारात्मक बदल घडवण्याची ताकद निर्माण होते.
या कार्यक्रमात माझ्यासोबत भाजपा उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री श्री. विठ्ठल बंधेरी जी, तसेच माजी नगरसेवक श्री. अनिश मकवानी जी उपस्थित होते. प्रमाणपत्र घेतलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा!















Leave a Comment