

पदभार स्वीकारल्यानंतर माझी सर्वप्रथम मुंबईतील भाजपाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रमांची आखणी, आणि पक्षाची ताकद अधिक बळकट कशी करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या, स्थानिक समस्या, पक्षाची कार्यप्रणाली आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठीचे उपाय यावर मंथन करण्यात आले. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापले अनुभव, यशोगाथा आणि पुढील कामाची दिशा स्पष्ट केली, त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या संवादातून पक्षातील एकसंघता, गतिमानता आणि जनसेवेची तत्परता अधिक दृढ झाली आहे. आगामी काळात भाजपाला मुंबईत अधिक बळकट करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला.







Leave a Comment